Showing posts with label Birds. Show all posts
Showing posts with label Birds. Show all posts

Wednesday, May 2, 2012

तुझी माझी प्रीत जगावेगळी!


तट्टेकाडच्या जंगलाइतके पक्ष्यांचे वैविध्य भारतात इतरत्र कुठेच नाही. पण आज या लावण्याच्या खाणीकडेही कंत्राटदार काकदृष्टीने बघताहेत. नऊ टक्‍क्‍यांनी पैसा फुगवत राहण्याच्या कैफात निसर्गसृष्टीची नासाडी होत आहे. हे शहाणपणाचे आहे का?

आपल्या सह्याद्रीवरचा बेडूकतोंड्या एक अफलातून पक्षी आहे. अगदी जगावेगळे प्रेम करणारा. पाखरांतल्या या येथील लैला-मजनूंची जोडी तासन्‌तास, दिवसन्‌दिवस, वर्षानुवर्षे एकमेकांना बिलगून असते, पंखाला पंख चिकटवून ! हा बेडूकतोंड्या भरपूर पावसाच्या प्रदेशात फोफावणाऱ्या सदाहरित अरण्याचा रहिवासी आहे. कोकण-मलबार अन्‌ पश्‍चिम घाटाचा मूलनिवासी. आज या साऱ्या मुलखातली वनराजी छिन्नविछिन्न झाली आहे. नैसर्गिक अरण्याच्या जागी रबराचे मळे, नारळी-पोफळीची कुळागरे, भातखाचरे, निलगिरी-अकेशियाची कृत्रिम जंगले, उजाड माळराने, नाही तर इमारती आणि रस्ते यांचे जोरदार अतिक्रमण होत चाललेय. पण सुदैवाने कुठे ना कुठे घनदाट वनकाननाचे अवशेष टिकून आहेत. त्यातलेच एक आहे केरळच्या किनारपट्टीवरचे नदी-नाल्यांनी वेढलेले तट्टेकाड. जिकडे तिकडे ओढी-तळी आणि उत्तुंग वृक्षराजी. साहजिकच जीवसृष्टी बहरली आहे. रंगीबेरंगी मासे आणि फुलपाखरे, भली-थोरली जाळी विणणारे कोळी आणि पक्षीच पक्षी....


सह्याद्रीच्या वर्षावनातल्या बेडूकतोंड्यांची अतूट जोडी. (छायाचित्र : डॉ. ललिता विजयन)

ख्यातनाम पक्षितज्ज्ञ सलीम अली सांगायचे - एका सकाळी दुसरीकडे कुठेही इतक्‍या जातींचे पक्षी भेटत नाहीत. तू तट्टेकाडला जायलाच पाहिजे. नुकताच तो योग आला. सलीम अलींचे विद्यार्थी सुगतन तट्टेकाडला पक्षिशास्त्रज्ञ म्हणून काम पाहतात. त्यांच्या सोबतीत दिवसभर मनमुराद भटकलो. बेडूकतोंड्यांच्या एकूण चाळीस जोड्या तट्टेकाडची खासियत आहेत. हे बेडूकतोंडे घुबडांसारखे रात्री पोटपूजेला बाहेर पडतात. मोठा "आ' वासून उडत उडत रातकिडे मटकावतात. पहाटे निवाऱ्याच्या जागी परततात. त्यांचे रंगरूपच असे आहे, की झाडांवरच्या पालवीत बेमालूम मिसळून जातात. अनेक प्राणी असे "कामुफ्लाज' करतात; पण बेडूकतोंड्यांची सर कोणालाच येणार नाही. म्हणूनच बेडूकतोंडे बिनधास्त असतात. त्यांच्या कितीही जवळ पोचलो तरी हूं की चूं करत नाहीत. पहाटेपासून अंधार पडेपर्यंत ठराविक जागी, जोडी-जोडीने, एकमेकांना चिकटून निवांत बसून राहातात.

सुगतन यांना इथल्या झाडून साऱ्या बेडूकतोंड्या जोड्या कुठे ठाण मांडतात ते ठाऊक आहे. म्हणाले, "चल, बघायला.' काट्याकुट्यातून अचूक वाट काढत ते एका झाडापाशी घेऊन गेले. सांगायला लागले, "ते बघ पक्षियुगुल.' मी चक्रावलो. "कुठे आहे? मला तर काही उमगत नाही.' मग डोळे फाडून पाहिल्यावर दिसली - अगदी नाकासमोर, तीन फुटांवर, गपचिप बसलेली बेडूकतोंडी जोडी. पाने मध्ये येत होती म्हणून ती जरा सारून पाहायला गेलो, तर पुन्हा गायब. सावकाश लक्षात आले, की अगदी नि:स्तब्ध, फक्त डोळे विस्फारून आमच्याकडे टक लावून बघताहेत. सुगतन म्हणाले, "गेली तीन वर्षे चार महिने ही जोडी अशीच याच जागी ठिय्या देऊन आहे.' दुसऱ्याही अनेक जोड्यांची हीच कथा. खरेच, अजब है मालिक तेरी दुनिया !

आज हे बेडूकतोंडे आणि त्यांची निवासस्थाने दुर्मिळ झाली आहेत. तट्टेकाड हे त्यांचे सर्वांत सरस वसतिस्थान आहे. पण आता या तट्टेकाडवरही कंत्राटदारांची वक्रदृष्टी वळली आहे, या जंगलातून एक भलामोठा टोल रस्ता बांधण्यासाठी. या नैसर्गिक लावण्याच्या खाणीची नासधूस करण्यासाठी. तट्टेकाडजवळच त्रिचूर शहर आहे. त्रिचूरजवळ नुकताच एक टोल रस्ता बांधला आहे. तो रस्ता बांधणाऱ्या कंत्राटदाराला सरकारमान्य दराच्या तिप्पट खर्चाची मंजुरी दिली गेली. त्या आधारे तो अवाच्या सव्वा टोल आकारणार आहे. शिवाय केवळ गावाबाहेरच्या नाही, तर गावातल्या गावात फिरणाऱ्यांनाही टोल भरावा लागणार आहे. लोक संतापलेत. मी तट्टेकाडहून रात्री त्रिचूरला पोचलो. त्या मध्यरात्रीपासून टोल गोळा करणे सुरू होणार होते. मी दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा टोल बूथशी पोचलो, तर काय! सगळ्या काचा फुटलेल्या, सगळे बूथ रिकामे. रात्री मारामारी होऊन लोकांनी टोळभैरवांना हाकलले होते.

हा हिंसाचार निश्‍चितच असमर्थनीय आहे, निंद्य आहे. पण असा संघर्ष का उफाळतो, हेही समजावून घ्यायला हवे. आपल्याला असे महागडे प्रचंड रस्ते हवेच का? का केवळ पैशांच्या लोभाने ते आपल्यावर लादले जाताहेत? अशा रस्त्यांपायी तट्टेकाडसारखे दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललेले सृष्टिसौंदर्याचे ठेवे उद्‌ध्वस्त करायलाच हवेत का? एकूण काय चालले आहे? नाही सौंदर्याची मोजणी - नाही संघर्षाची टोचणी - विकास म्हणजे निव्वळ पैशांचे पाणी पाणी आणि धनिकांची संपादणी ! वाटते, नऊ टक्के आर्थिक विकासाच्या नशेत आपण चिरस्थायी मानवी मूल्यांना मूठमाती देताहोत. एक वेळ बेडूकतोंड्यांसारखे गपचिप बसलो तर बसलो, निदान त्यांच्यासारखे डोळे वटारून पाहू या ना, विचार करू या ना!

(लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)
Original Story

Wednesday, November 30, 2011

400 flamingos die in Gujarat



 
AHMEDABAD: Greater Flamingos, (Phoenicopterus roseus) which fly thousands of miles from Siberia to breed in the warm marshes of the Khadir region in Kutch, are landing into a death trap. In the past 10 days, at least 400 of these graceful birds have been electrocuted by high tension cables near their breeding grounds.

D K Sharma, chief conservator of forests, admitted to at least 130 deaths, but locals and ornithologists have been recording much higher numbers. The flamingos have landed in record numbers this year, with one estimate putting their strength at five lakh, the highest ever.

Experts said the deaths were taking place at night, when the birds disturbed by passing vehicles would fly straight into the wires. The 220-400 kilowatt cables can kill a human being instantly.

Bharat Jethawa, census coordinator for Asian Water Birds, said, "It is difficult to estimate the number of deaths, but I saw dead flamingos at three or four places during a recent visit."

This is the second instance of mass electrocution of the birds in Gujarat this year. In June, a large number of flamingos were similarly killed in Bhavnagar. The dead birds became an easy meal for stray dogs in the area.

Experts said the problem had grown in recent years. In their recently published study titled 'Flamingo mortality due to collision with high tension electric wires in Gujarat', ornithologists Anika Tere and B M Parasharya mapped seven sites in Kutch, Bhavnagar and Jamnagar where high tension cables run close to flamingo sites.

Jugal Tiwari of the Centre for Desert and Ocean said birds of prey like harriers also contribute to the deaths by creating a flutter in flamingo colonies, leading to the birds flying into the cables.

"I have suggested that the cables should be insulated with rubber coating to protect the birds," Tiwari said.

The forest department has written to the state government's energy department, asking for the cables to be either insulated or put underground at places where they run close to flamingo breeding grounds. 


Full Story

Sunday, July 31, 2011

माळढोक वाचविण्यासाठी..

डॉ. प्रमोद पाटील ,गुरुवार, २८ जुलै २०११

नान्नज अभयारण्याचे क्षेत्र कमी केल्याने माळढोक संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. याच्या पुढे आता नेमके काय उपाय करायला हवेत याबाबत वन्यजीव संशोधकाने केलेली अभ्यासपूर्ण मांडणी..माळढोक पक्षी अभयारण्याचे क्षेत्रफळ ८,५०० वरून केवळ १२२२ चौरस किमीपर्यंत कमी केल्यावर उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. केवळ कागदोपत्री असलेल्या या अजस्त्र अभयारण्याचा आकार कमी झाल्यामुळे स्थानिकांचा रोष कमी होऊन माळढोक संवर्धनाचा मार्ग मोकळा होत आहे. आता या पक्ष्याच्या संवर्धनाचा गांभीर्याने विचार करावा लागेल. सध्या देशात फक्त २५० माळढोक शिल्लक असून, नान्नज परिसरात ९-१० पक्षी उरले आहेत. याचवर्षी आंतरराष्ट्रीय समुदायाने माळढोकला अतिदुर्मिळ (क्रिटिकली एन्डेन्जर्ड) घोषित केले आहे. माळढोक संवर्धनासाठी पुढील उपायांची खूप गरज आहे.
१) प्रजननाचा अभाव- सद्य:स्थितीत माळढोक अभयारण्यात प्रजननाचा अभाव दिसून येतो. माळढोक वर्षांतून एकदाच प्रजनन करतो आणि मादी उघडय़ा माळावर एकच अंडे घालते. नैसर्गिक शत्रूंपेक्षाही मानवी हस्तक्षेपामुळे माळढोक प्रजननात बाधा येत आहे. माळढोकच्या यशस्वी प्रजननासाठी अतिसंरक्षित क्षेत्रांची (कोअर एरिया) निर्मिती करण्याची गरज आहे. अतिसंरक्षित क्षेत्रामध्ये संपूर्ण संरक्षण व अधिवासाचे व्यवस्थापन करावे लागेल. हे क्षेत्र माळढोकबरोबरच लांडगा, खोकड, कोल्हा, काळवीट तसेच अनेक प्रकारच्या पक्ष्यांना प्रजननासाठी उपयोगी पडेल. अतिसंरक्षित क्षेत्राचा आकार साधारण ५०० हेक्टपर्यंत असल्यास माळढोकच्या सर्वच गरजा पूर्ण होतील. या क्षेत्रांना लागून राखीव माळरान क्षेत्र ठेवणे गरजेचे आहे. या राखीव क्षेत्राचा उपयोग माळढोकप्रमाणेच स्थानिक लोकांनाही पारंपरिक शेती व योग्य प्रमाणातील गुरेचराईसाठी करता येईल. अधिवास व्यवस्थापनासाठी दरवर्षी मोठय़ा निधीची तरतूद करावी लागेल.
२) शिकार व रानवणवे- शिकारीमुळे पूर्वी माळढोकची संख्या घटली. आजही ती होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. अभयारण्य व लगतच्या परिसरात शिकारीवर नियंत्रण ठेवायचे असल्यास नियमित गस्तीची गरज आहे. दरवर्षी अभयारण्यात आगी लागून गवत व लहान मोठय़ा वन्य प्राण्यांची हानी होते. नियमित गस्तीमुळे आगीवर नियंत्रण राहील. पण नियमित गस्तीसाठी वाहन व इंधनाची आवश्यकता आहे.
३) कुत्री आणि कावळे- नान्नज परिसरात माळढोकच्या प्रजननातील दोन मोठे अडथळे म्हणजे कुत्री आणि कावळे! आसपासच्या गावातील कुत्री अतिसंरक्षित प्रजनन क्षेत्रात घुसतात. कावळे तर माळढोकची अंडी फोडून खातात. कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी ठरावीक क्षेत्राभोवती चर खोदणे अथवा कुंपण करण्याचा प्रयोग करावा लागेल. कावळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आजूबाजूच्या सर्वच गावांची पूर्ण स्वच्छता करावी लागेल.
४) मानवी हालचाली व हस्तक्षेप- माळढोकच्या प्रजनन काळात प्रजनन क्षेत्रामध्ये मानवी हालचाली बंद करणे अपरिहार्य आहे. यासाठी प्रजनन काळात चराईस निंर्बध आणि अतिसंरक्षित क्षेत्रालगतच्या रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी थांबवणे गरजेचे आहे. स्थानिकांना विश्वासात घेऊन पर्यायी रस्ते उपलब्ध करण्याचा विचार करावा लागेल.
५) पारंपरिक शेती, कीटकनाशके- पारंपरिक शेती व धान्य पिके माळढोकच्या अधिवासातील अविभाज्य घटक आहे. माळढोक धान्य खातो, पण त्याहूनही अधिक प्रमाणात शेतातील कीड खाऊन शेतकऱ्यांची मोठी मदत करतो. पण आधुनिक शेती व कीटकनाशकांचा वाढता वापर त्याच्यासाठी घातक ठरत आहे. माळढोक आणि माणूस दोघांच्या आरोग्यासाठी सेंद्रिय शेती करणे आवश्यक आहे.
यासाठी सरकारी मदत, कीटकनाशकांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती व सेंद्रिय शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे जरुरीचे आहे.
६) स्थानिक जनजागृती- अभयारण्य क्षेत्रामध्ये सध्या माळढोकविरोधी वातावरण आहे. तसेच नवीन पिढीमध्ये माळढोकबद्दल काहीच माहिती नाही. माळढोकविषयी प्रेम व आपुलकी निर्माण होण्यासाठी शाळा, महाविद्यालयांतून जागृती करण्याची गरज आहे.
७) वनखात्याचे सक्षमीकरण- माळढोक संवर्धनासाठी आधी वनखात्याचे सक्षमीकरण गरजेचे आहे. एवढय़ा मोठय़ा अभयारण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बऱ्याच वनकर्मचाऱ्यांची गरज आहे. यासाठी त्यांची क्षेत्रनिहाय नियुक्त करण्याची गरज आहे. त्यांच्या चांगल्या कामांचा पुरस्कार, समस्यांचे निराकरण, माळढोकसाठीच्या कामासाठी आर्थिक पाठबळ व प्रोत्साहन, छोटय़ा अभ्यासप्रकल्पांसाठी तसेच कायमस्वरूपी सर्वेक्षणासाठी मदत अशा गोष्टींची गरज आहे. वनकर्मचाऱ्यांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोनाची वाढ होण्यासाठी नियमित कार्यशाळा व अभ्यासप्रकल्प राबवावे लागतील. वनखात्याच्या समस्या सुटल्याशिवाय माळढोकच्या समस्या सुटणार नाहीत.
८) माळढोक गणना- पुणे वन्यजीव विभागामार्फत दरवर्षी माळढोक गणना केली जाते. वनखाते व माळढोक फाउंडेशनमार्फत मागील वर्षांपासून गणनेआधी कार्यशाळा घेण्यात येते. तसेच माळढोक प्रगणना पुस्तिका (सेन्सस मॅन्युअल) बनवण्याचे कामही सुरू आहे. माळढोकची नेमकी संख्या व हालचालीची माहिती मिळवायची असेल, तर एकाच वेळी बऱ्याच मोठय़ा प्रदेशावर गणना करावी लागेल. तसेच जी.पी.एम. सारख्या प्रगत उपकरणांचा वापर करावा लागेल.
९) माळढोक पर्यटन व स्थानिकांचा फायदा- माळढोक पक्षी पाहण्यासाठी दरवर्षी अनेक पर्यटक नान्नजला भेट देतात. माळढोक संवर्धनात स्थानिकांचा सहभाग वाढवायचा असेल तर माळढोक पर्यटनातून त्यांचा प्रत्यक्ष फायदा करून देता आला पाहिजे. यासाठी पर्यटन शुल्क आकारून त्या पैशातून लोकहिताची कामे करणे तसेच स्थानिक उत्पादनांच्या विक्रीतून आर्थिक पाठबळ निर्माण करण्याची गरज आहे.
१०) संशोधन- पावसाळा सोडल्यास माळढोक अन्य ऋतूंमध्ये नेमके कुठे जातात व कसे राहतात हे जाणून घेणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्यक्ष सर्वेक्षण, स्थानिक लोकांकडून माहिती मिळवणे तसेच उपग्रहांच्या मार्फत (सॅटेलाइट ट्रेकिंग) अभ्यास होणे जरुरी आहे. हे उपकरण माळढोकच्या पाठीवर बसवण्यासाठी त्यांना पकडावे लागते. त्यात पक्षी गमावण्याची शक्यता असते. अभयारण्य सीमेच्या बाहेर आढळणाऱ्या माळढोकच्या संवर्धनासाठी स्थानिक संस्था व शेतकऱ्यांनी एकत्र येणे महत्त्वाचे आहे.
११) राष्ट्रीय माळढोक संवर्धन आराखडा- माळढोकच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय माळढोक संवर्धन आराखडा व राज्य आराखडय़ाचे काम सुरू आहे. या दोन्ही योजनांमध्ये माळढोकच्या सर्व समस्यांचा ऊहापोह केला असून त्यावर नेमके उपाय सुचवले आहेत. सध्या या आराखडय़ाचे काम सुरू आहे. त्यानंतर लवकरच या योजना मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहेत. या योजना यशस्वीपणे राबवल्या गेल्या, तर माळढोक संवर्धनाचे नवे पर्व सुरू होईल. याचा फायदा माळढोक, माळरान आणि माणसालाही होईल.
१२) बंदिस्त प्रजनन- भारतीय गिधाडे झपाटय़ाने नष्ट झाली. ती समूळ नष्ट होऊ नयेत यासाठी त्यांचे बंदिस्त प्रजनन सुरू केले गेले. याच धर्तीवर माळढोकचे देखील बंदिस्त प्रजनन होणे आवश्यक आहे. जगातील माळढोक गटातील अन्य पक्ष्यांचे यशस्वी प्रजनन सुरू आहे. आपल्याकडेही ते अवघड नाही. यासाठी थोडेसे धाडस, आंतरराष्ट्रीय मदत व सरकारी सहकार्याची गरज आहे.
हा राजबिंडा पक्षी आपल्या आजूबाजूच्या माळरानावर सर्रास आढळायचा, आज फक्त २५० माळढोक उरले आहेत. त्याच्या बिकट परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत. आता त्याला संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारीही आपलीच आहे. त्यासाठी गरज आहे, प्रत्येकाच्या वैयक्तिक इच्छाशक्तीची!



Full story 

Monday, April 25, 2011

गिधाडे वाचविण्यासाठी भरपाईचा नारळ

राजेंद्र पाष्टे - सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - विणीच्या हंगामात माडावर घरोबा करणाऱ्या गिधाडांच्या प्रजाती संरक्षित करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रती नारळामागे शेतकऱ्याला भरपाई देण्यात येणार आहे. वनविभाग आणि कृषी विभागातर्फे ही "गिधाड संरक्षित मोहिम' राबविण्यात येणार असून घरटी असलेल्या शेतकऱ्यांना त्यामुळे भरपाईचा "नारळ' मिळणार आहे.

जीवसृष्टीच्या श्रुंखलेत गिधांडाचे महत्व शास्त्रज्ञांनी अधोरेखित केले आहे. गिधाड अन्नसाखळीतील महत्वाचा घटक आहे. दापोली तालुक्‍यात गिधाड संरक्षित केंद्रही स्थापन करण्यात आले आहे. वाघ या वन्य प्राण्यानंतर दुर्मिळ होत चाललेल्या पक्षी वर्गातील गिधाडाचा क्रमांक दुर्मिळ जातीत दुसरा मानला जातो. नैसर्गिक कचरा निचरा व्यवस्थापनात गिधाड हा पक्षी नैसर्गिकरीत्या पर्यावरण स्वच्छ करण्याच्या कामात महत्वाचा घटक आहे; मात्र त्याची संख्या आता रोडावली आहे. अलीकडेच झालेल्या पक्षीगणनेत ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यासाठी आहे त्या गिधाडाच्या जातींना संरक्षित करण्यासाठी वन आणि कृषी विभागातर्फे सयुंक्त मोहिम राबविण्यात आली आहे.



गिधाड संरक्षण मोहिम आणि भरपाई
* नारळाचे हंगामातील प्रती झाड उत्पादनाचा दाखला अधिकाऱ्यांकडून घ्यावा.
* गिधाडांची घरटे नारळाच्या झाडावर असल्याचा वनविभागाचा दाखला.
* त्यानुसार प्रत्येक हंगामात प्रती फळ सात रुपये किंवा चारशे रुपये भरपाई.
* गिधाडाचा विणीचा हंगामसंपेपर्यंत घरट्याला संरक्षण आणि नारळाला भरपाई.

संपूर्ण बातमी

Sunday, September 6, 2009

Musician of the monsoon

T.R. SHANKAR RAMAN
The Malabar Whistling Thrush is a flautist of unbridled creativity but, given the wanton destruction of its habitat, how much longer will we hear its music?

Along hill roads, it is often seen perched on culverts, a habit shared with its Himalayan cousin, the Blue Whistling Thrush.
Photo: Ramki Sreenivasan

Lone watcher: A Malabar whistling thrush near a hill stream in the Western Ghats.
Mystical whistles float out of the depths of the dark rainforest, through mercurial mist and morning air. The notes are continuous, almost breathless, yet gracefully slow and pleasing. This is no repetitive tune — it is an entrancing melody of ever-varying notes that rise and fall in an unpredictable series of undulating tones. In this forest — the notes seem to suggest — lives a flautist of the most unbridled creativity.
Secret songster
Nearby, a rippling stream of cool, clean water — fed by monsoon rains and deep aquifers — courses down a ravine of rounded pebbles and stubborn boulders. The sparkle is now stolen from the water by the towering forest canopy, but the water and its murmuring voice flow unhindered. The fluty whistles continue to flow, too, as the secret songster fills the crystal morning with music.
The bird producing these enchanting tunes is, at first sight, almost unremarkable in appearance. As the sun climbs and the mist dissipates, it is seen perched on a boulder by the stream; it appears simply black. Yet, the plumage has a sleek, glossy finish and the bird, unconcerned by the apparent simplicity, carries a proud, erect bearing, chin up and chest out. It bobs smartly to attention, fanning its tail open and closed, up and down, and surveys the stream with a stern eye like a general surveying his territory. It almost seems, if the bird had heels to click, it would. Its military sprightliness is strangely accentuated when sunlight catches its black uniform. Suddenly, the drab black acquires an iridescent sheen with purple and blue, and on the forehead and shoulders glisten — like epaulets of high rank —spangled badges of ultraviolet finery.
Birdwatchers call this bird the Malabar Whistling Thrush, a species found in the Western Ghats and associated hill ranges of India. The name, adequate though it is, does little to describe the landscape of hill forests and streams that is its home. Here be a bird — the name seems to say — a thrush it is by appearance and ancestry; it whistles, for sure, as one can attest; and by christening it Malabar a certain perfunctory attention is paid to its provenance. A more casual tag is sometimes affixed, stemming from an interpretation of its carefree and rambling whistles; the “whistling schoolboy”. And yet, when one awakens on monsoon mornings to the symphony of its whistles, the name seems inadequate, and one wishes one had greater tribute to pay. In the great traditions of Hindustani classical music, it is the Raag Malhar that is associated with the rains; among our birds, surely then, this is the Malhar whistling thrush.
The whistling thrush has a fondness for flowing waters on the hill slopes. There it hunts aquatic snails, frogs, and crabs, staying open to what opportunity may offer, including worms and bird nestlings. Holding the prey firmly in its bill, the thrush batters it lifeless on a rock before consuming it, concluding their predatory bout with a piercing whistle, perhaps, or a dipping flight down the stream in search of more. With the approach of the monsoon, as the streams are recharged with waters, its song acquires a new zest and the bird begins to breed, even as other bird species in the rainforest are already done with their nesting and are out with their young. It builds a nest in little nooks and crevices along streams, among rocks and cut banks. When forests give way to plantations and rocks to buildings and bridges, the thrush, fortunately, is forgiving and may adopt a space under the eaves or a hole in a wall to nest. Yet, the streams and rivers are never far.
As long as the streams are alive, even with a vestige of flowing water, the thrush may survive in the ever-changing hillscapes. One may see it in coffee, cardamom, and tea plantations, swamps, and rocky, wet slopes, and hill towns. Along hill roads, it is often seen perched on culverts, a habit shared with its Himalayan cousin, the Blue Whistling Thrush. Seeing culvert after culvert with its resident bird, a friend in government service coined an official designation: “culvert-in-charge”.
When streams wane and disappear with man-wrought transformation of land and water, and the last vestiges of forest vanish for some human purpose, the thrush numbers decline. Clearly, there is a measure to its forgiveness, too. And where the thrush has disappeared, the mornings are now bereft of beautiful song.
Quenching our thirst
Today, the whistling thrush persists in these hills. Amidst a litany of ugliness — pesticides and poisons, check-dams and catapults, pebble pillage and boulder burglary, sand mining and dynamite fishing, drainage and diversion — the whistling thrush survives and fills the air with songs of rare beauty. As the rivers and streams transform to dreary drains and smothered swamps, as rank grass and sedge and weed take over spaces where verdant moss grows and wild balsams bloom, the whistling thrush hangs on to the land like a question mark hangs in the wind. Will we cherish the whistling thrush as a marker of our hills and streams? Or will we let it slide, like the dead waters of fouled rivers deflected into our modern reservoirs of stagnation? If we do value the thrush and treat its home and its haunts with greater respect, then, perhaps, there will be a different future. One where we can still dip our hands into cool, clear waters of many a hill stream and raise it to our lips to slake our seemingly insatiable human thirst, even as the song of the whistling thrush quenches an intangible inner human spirit.
One cannot imagine these hills without the whistling thrush. The day its song fades from these hills would be a day as of unbearable pain, of unbridgeable loss. And when the monsoon arrives to revive the parched hills, with its thunder and clouds and lashing winds and pelting rain, there will be a strange emptiness. For in the hills of the Western Ghats, it is not just the rain, but the voice of the whistling thrush that sings the music of the monsoon.
T. R. Shankar Raman is with the Nature Conservation Foundation, Mysore E-mail: trsr@ncf-india.org
Story